Wednesday, May 29, 2019

प्रभात फिल्म कंपनीचा ९० वा वर्धापनदिन


भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ‘प्रभात पर्व’ सुवर्णा अक्षरांत नोंदवलं गेलं आहे. पार्वतीबाई दामले ह्यांनी स्थापनेचा मंगल कलश १ जून १९२९ रोजी  ठेवला. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ मध्ये बाबूराव आणि आनंदराव पेंटर ह्यांच्या हाताखाली चित्रपट निर्मितीचे धडे घेणाऱ्या दामलेमामा, एस फत्तेलालव्ही शांताराम आणि धायबर यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ सोडली. स्वत:ची चित्रपटनिर्मिती कंपनी सुरु करण्याचा ध्यास सर्वांना लागून राहिला होता. कोल्हापूरातील सुप्रसिद्ध सराफी पेढीचे सितारामपंत कुलकर्णी ह्यांची दामलेमामांशी जुनी मैत्री होती. आणि त्यांचा दामलेमामांवर विश्वास होता. त्याकाळात सितारामपंतानी दामल्यांना भांडवल देऊ केलं. दामले– फत्तेलालांबरोबर शांताराम व धायबरही एकत्रित झाले, आणि ‘प्रभात’ची स्थापना १ जून १९२९ रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठेत झाली. आज ‘प्रभात’च्या स्थापनेस ९० वर्ष होत आहेत.
१९२९ ते १९३२ ह्या दरम्यान प्रभातकारांनी सहा मूकपटांची निर्मिती केली. तर १९३२ साली ‘अयोध्येचा राजा’ ह्या बोलपटाची निर्मिती केली. आजमितीस भारतीय चित्रपटसृष्टीतला हा सर्वात जुना बोलपट सुस्थितीत जतन केला गेला आहे. १९३४ साली प्रभातचं पुण्यातील प्रभातनगर येथे स्थलांतर झालं. दामलेमामांच्या देखरेखेखाली प्रभातची वास्तू उभी राहिली. त्याकाळात आशियातील सर्वात मोठा स्टुडिओ अशी ‘प्रभात’ ची ख्याती होती.
१९३२ ते १९३४ दरम्यान ‘प्रभात’ने ६ बोलपटांची निर्मिती केली. प्रभातचे नाव सिनेजगतात आणि रसिकांमध्ये सुपरिचित झालं. तर १९३३ मध्ये ‘प्रभात’ने भारतातील पहिला रंगीत बोलपट सैरंध्री’ निर्माण केला. आजमितीस  २०१९ साला मध्ये सदर ‘प्रभात’ च्या वास्तू मध्ये ‘फिल्म अँड टी व्ही इन्स्टिट्यूट’ मोठ्या दिमाखात उभी आहे. तेथील विद्यार्थी आम्हाला भेटतात तेव्हा प्रत्येकजण भारावल्यासारखा बोलतो. कौतुक आणि आदराने सगळेजण बोलतात ते संत तुकारामबद्दल. आणि १९३४ साली दामले मामांनी कोणत्या विचारानी हा स्टुडिओ उभारलात्यांना शतश: प्रणाम.
१९३४ ते १९५७ हा ‘प्रभात चा पुण्यातील कालखंड. त्या दरम्यान २६ बोलपटांची निर्मिती झाली.पैकी ९ बोलपटांनी इतिहास घडवला. जागतिक चित्रपटसृष्टीमध्ये ह्या बोलपटांची दखल घेतली गेली.
१९५७ साली प्रभात बंद झाली. १९५७ ते १९५९ ह्या  कालावधीत एस.एच केळकर ह्यांनी प्रभात चालवली. पुढे १९६१ साली भारतीय सरकारने ही कंपनी विकत घेऊन ‘फिल्म अँड टी व्ही इन्स्टिट्यूट’ची स्थापना  झाली. दामले मामांचे एक स्वप्न होतं की ‘प्रभात’मध्ये चित्रपट निर्मितीचं प्रशिक्षण द्यावं. प्रभात मध्ये हे साध्य झालं नव्हते, पण त्यांनी उभारलेल्या वास्तूमध्ये ‘एफ. टी.आय.आय’ दिमाखात उभं आहे.
१९५७ साली ‘प्रभात’ च्या अस्तानंतर सर्व चित्रपटांचे  हक्कही विकले गेले. ‘प्रभात’ चा हा सर्व अमूल्य खजिना हळुहळू पडद्यामागे जाऊ लागला. भारतीय चित्रपटांचा हा इतिहाससुद्धा पुसट होत गेला. एक वेळ अशी आली कीप्रभात’चे हे जगविख्यात चित्रपट पहायचे  कसे १९६९ साली उत्तम योग जुळून आला. माझे वडिल अनंतराव दामले ह्यांनी प्रभातच्या सर्व चित्रपटांचे हक्क परत मिळवले. त्यानंतर गावोगाव  सदर चित्रपटांचे आठवड्याच्या आठवडे प्रदर्शन  होऊ लागले. रसिकांना हा ठेवा परत  मिळाला. ‘प्रभात’ पर्वाची परत सुरुवात झाली. बदलत्या काळानुरूप व्हिडिओडीव्हीडी आम्ही दामले कुटुंबियांनी बनवल्या.  ‘प्रभात’ काळातील अनेक दुर्मिळ फोटो,कागदपत्रे चित्रपट ह्या सर्व ठेव्याचं डीजीटायझेशन व संवर्धनाचे काम आम्हा दामले कुटुंबियांतर्फे आजमितीस सुरु आहे.
अरुणाताई दामले (माझ्या आई) यांनी अनेक वर्ष प्रभात गीते कार्यक्रम सादर करून प्रभातच्या अवीट गाण्यांचा आस्वाद रसिकांना दिला. अरुणाताईंनी लिहिलेल्यामराठी चित्रपट ‘संगीताची वाटचाल’  ह्या अभ्यास ग्रंथाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
दामले कुटुंबियांतर्फे निर्मित दोन माहितीपटांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. इट्स प्रभात’ हा माहितीपट ‘प्रभात’च्या ७५ व्या स्थापनेच्या वर्धापन वर्षी म्हणजे २००४ साली निर्माण केला होता. तर २०१२ साली विष्णुपंत दामले’ बोलपटांचा मुकनायक हा माहितीपट निर्माण केला. प्रभातची धुरा पुढे नेताना ह्या तीन राष्ट्रीय पुरस्कारांचा विशेष उल्लेख करावा लागेल.
अलीकडे नव ‘प्रभात स्टुडिओ’ ह्या नावाने सुरु केलेल्या उपक्रमांमार्फत माहितीपटांचं संकलन केलं जातं आहे. प्रभातकारांनी १५ लघुपटांची / माहितीपटांची निर्मिती केली होती. त्यापैकी काही लघुपट जतन करून आम्ही त्याच्या डीव्हीडी तयार केल्या आहेत. एक काळ असा होता की,  चित्रपटक्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारास तंत्रज्ञांना ‘प्रभात’ मध्ये काम मिळवून काही तरी नवीन शिकायला मिळेल. ह्यासाठी यावसं वाटायचं. प्रभातकारांनी अनेक सामान्य माणसांतून अचूक निवड करून अनेक कलाकार घडवले. ही एक चित्रपटक्षेत्रास ‘प्रभात’ने दिलेली देणगीच होती. देव आनंद या सुप्रसिद्ध कलाकाराचं चित्रपटसृष्टीत  पदार्पण १९४६ साली  प्रभातच्या ‘हम एक है’ ह्या चित्रपटातून झालं.
५/६वर्षापूर्वी आम्ही ‘मादागास्कर’ बेटावर गेलो होतो. तेथील विशेष प्राणी ‘लेम्युर’ पहाण्यास एका अभयारण्यात गेलो. तिथे ‘लेम्युर’ प्राण्यावर थ्री.डी फिल्म बनवण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यामुळे तीन दिवस तेथे जाण्यास कोणालाच परवानगी नव्हती. आम्ही खजिल झालो. तेव्हा  माझी पत्नी  तेथील एका महिला अधिकाऱ्यास म्हणाली आम्ही भारताहून हा खास प्राणी पाहण्यास आलो आहोत. माझा नवरा अनिल दामले हा भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रभातच्या दामले कुटुंबियातील आहे. त्याच्या आजोबांनी संत तुकाराम’ संत ज्ञानेश्वर’ असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. ते ऐकून ती  महिला (तीच नाव पॅट्रोशीया राईट)खुर्चीत उठून उभी राहिली. मोठ्या आदरपूर्वक आवाजात म्हणाली आमच्या केलीफोर्निया येथील फिल्म मेकिंग कोर्समध्ये प्रभातचा ‘संत तुकाराम’ हा चित्रपटांत प्रथम दाखवतो. तुम्ही त्या प्रभातच्या दामले कुटुंबियातील आहात म्हणत तिचा एक सहकारी आमच्याबरोबर दिला. व अभयारण्यात जाण्याची परवानगी दिली. प्रभात महिमा अजूनही टिकून आहे. आणि तो असाच कायम राहील कारण ‘प्रभात’च्या त्या अजरामर कलाकृती !
प्रभातचा महिमा आणि जादू इतकी जबरदस्त होती की,  देशभरात गावोगावी ‘प्रभात’ नावाची अनेक सिनेमा थिएटर्स अस्तित्वात आली. आजही प्रत्येक मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची  सुरुवात ‘प्रभात’ मधील लख लख चंदेरी’ गाण्याने होते’.
‘प्रभात’ च्या ९० वर्षांच्या गौरवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा :
१. १९३० - बालकलाकारांची प्रमुख भूमिका असणारा ‘बजर बट्टू’  हा भारतातील पहिला चित्रपट.
२. १९३२ - मराठीतील पहिला बोलपट 'अयोध्येचा राजा.’
३. १९३३ – ‘प्रभात’च्या 'जलती निशानीहा चित्रपट अफ्रिकेत प्रदर्शित झाला.
              - भारतातील पहिला रंगीत चित्रपट 'सैरंध्री'ची निर्मिती.
'सिंहगडचित्रपटाच्या पुस्तिकांसाठी एम.एफ.हुसेन यांनी चित्र रंगवली आहे.
४. १९३५ - अमृतमंथनचित्रपट व्हेनिस चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला.
             - ‘प्रभात’च्या 'धर्मात्माचित्रपटात बालगंधर्वांनी संत एकनाथांची भूमिका केली होती.
५. १९३६ – ‘प्रभात’ निर्मीत आणि दामले-फत्तेलाल दिग्दर्शित 'संत तुकारामचित्रपटास व्हेनिस चित्रपट महोत्सवात         
         'जगातील ३ उत्कृष्ट चित्रपटांतील एक असा सन्मान मिळाला. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा पहिला चित्रपट    
         ज्याला आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला.

               - 'अमरज्योतीचित्रपटातून भारतीय पडद्यावर दर्यावर्दी जीवनाची पार्श्वभूमी या चित्रपटातून प्रथम दिसली.
          'संत तुकारामचित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेक विक्रम केलेत. सलग ५७ आठवडे हा     
          चित्रपट चालला. आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवणारा हा पहिला भारतीय चित्रपट.
       
६. १९३७ - 'कूंकु चित्रपटातील एका गाण्यात पार्श्वसंगीताचा वापर न करता गाणं चित्रित केलं. भारतातील हा पहिला प्रयोग होता.
'कुंकूह्या प्रभातच्या मराठी चित्रपटामध्ये पहिल्यांदाच इंग्रजी भाषेमध्ये गाणं चित्रित केलेले हा देखील   
  मराठीतील पहिलाच प्रयोग होता.

७. १९३८ - 'दुनिया न मानेचित्रपट व्हेनिस येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत प्रदर्शित. ह्याच चित्रपटास 'गोहर     
          गोल्ड मेडलमिळालं.

८. १९३९ - 'माणूसचित्रपटात बहुभाषिक गाणी चित्रित केलं हा सुद्धा पहिलाच प्रयोग होता.
९. १९४१ - 'संत ज्ञानेश्वरचित्रपट अमेरिकेत प्रदर्शित झाला हा भारतातला पहिला चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.
१०. १९४२ - व्ही. शांताराम ह्यांनी प्रभात सोडलं.
११. १९४५ - दामले मामांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन.
१२. १९४६ – ‘प्रभात’ निर्मित 'हम एक है ह्या चित्रपटातून देव आनंद ह्यांचं चित्रपटसृष्टीत पदार्पण.
१३. १९५७ – ‘प्रभात’ कंपनी एस.एच.केळकर ह्यांनी विकत घेतली.
१४. १९५९ - केळकरांनी कंपनी भारत सरकारला विकली.
१५. १९६१ - एफ.टी.आय.आय ची स्थापना.
१६. ‘प्रभात’च्या सर्व चित्रपटांचे हक्क अनंतराव दामले (माझे वडील) श्री. मुदलियार ह्यांकडून परत मिळाले. स्टुडिओचा    
   अस्त झाल्यापासून १२-१४ वर्ष हे जगप्रसिद्ध चित्रपट काळाच्या आड गेले होते. त्यानंतर अनेक गावांतून सिनेमा   
   थिएटरमध्ये प्रभातचे बोलपट दाखवण्यात आले. ‘प्रभात’ पर्वाची पुन्हा सुरुवात झाली. बदलत्या कालानुरूप व्हिडीओ
   कॅसेट्सडीव्हीडी अशा माध्यमात या चित्रपटांचे जतन व संवर्धन प्रभातच्या दामले कुटुंबियांतर्फे केलं जात आहे.
   ‘प्रभात’ काळातील अनेक दुर्मिळ पत्रलेखफोटो ह्या सर्वांचा सांभाळ करून डिजिटायझेशनचं काम सुरु आहे.
   अरुणाताई दामलेंनी (माझी आई) अनेक वर्ष ‘प्रभात गीते’ कार्यक्रम सादर केला. जुन्या व नव्या तरुण पिढीला ह्या
   सुमधुर अवीट गोडीच्या गाण्यांचा खजिना सादर केला. पुढे अरुणाताईंच्या 'मराठी चित्रपट संगीताची वाटचालया
   अभ्यासग्रंथास राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला तर दामले कुटुंबातर्फे निर्मित दोन माहितीपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त  
   झाले. २००५ साली 'It's Prabhat' व २०१२ साली 'विष्णुपंत दामले बोलपटांचा मूक नायकया दोन्ही माहितीपटांना
   राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. अलीकडे नवप्रभात स्टुडिओह्या उपक्रमांतून दामले कुटुंबीय शॉर्ट फिल्म्सच्या
   संकलनाचा उपक्रम करत आहेत.

१७. १९७२ - मुंबई दूरदर्शन वरील मराठी चित्रपट प्रक्षेपणाचा मुहूर्त १९४० साली ‘प्रभात’ ने निर्माण केलेल्या
          'संत ज्ञानेश्वरह्या चित्रपटाने झाला.



      अधिक माहितीसाठी - अनिल दामले ९७६४००५६२४

No comments:

Post a Comment